Posts

Showing posts from July, 2023

सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे

Image
सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे            साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे इतिहासाचे चिंतक होते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत सबाल्टर्न जाणीवा दिसून येतात. कारण साहित्य हे समाज परिवर्तनाचे फार मोठे साधन आहे. याची जाण अण्णा भाऊ साठे यांना होती. त्यामुळेच त्यांच्या साहित्यकृतीतून या सर्व गोष्टीवर प्रकाश पडतो. इतिहासकार डी.डी. कोशंबी यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ राजा, थोर पुरुष हे इतिहास घडविणारे घटक नाहीत तर खऱ्या अर्थाने उत्पादक व कामगार हे समाज घडविणारे घटक आहेत असे म्हटले आहे. त्यानुसार उपेक्षित समाजाच्या अभ्यासकांच्या मते, उपेक्षित समाजाचा इतिहास लिहिला पाहिजे. कारण यादेशातील कनिष्ठ व तुच्छ व्यक्ती शेवटी मनुष्यच आहेत. ते समाजाचे घटक आहेत. त्यांच्यातील जिवंतपणा, विचारशक्ती व प्रगतीची धडपड लक्षात घेतल्यास हा घटक डावलून जगाच्या इतिहासाला पूर्णत्व येणार नाही. कारण उपेक्षित व्यक्तींनी शोषणाविरुद्ध प्रतिकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्यामुळे सर्वच पातळीवर होणाऱ्या घडामोडी उलगडून दाखविण्याची ताकद व निर्भीडपणा उपेक्षितांच्या ...

आज १ ऑगस्ट साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. यानिमित्ताने त्यांचे जीवन व कार्य सांगणारा हा लेख

Image
आज साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. यानिमित्ताने त्यांचे जीवन व कार्य सांगणारा हा लेख              आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडा, लावण्या व वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचे माहात्म्य शब्दात मांडता येणार नाही असेच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित असणा-या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आपली एक वेगळीच छाप लोकांसमोर पाडली. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. त्यांचा जीवनप्रवास खूपच रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. अशिक्षित असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे.               त्यांनी  लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य,कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्...

'शिक्षण', प्रश्न सोडवणारं हवं! : प्रा. निरंजन फरांदे

Image
'शिक्षण', प्रश्न सोडवणारं हवं! : प्रा. निरंजन फरांदे            उन्हाळ्याचे दिवस. त्यात भर दुपारची वेळ. वेगात धावत असलेली बस अचानक कुठल्यातरी उड्डाणपूला खालून मोठे वळण घेते. ब्रेकचा कर्कश्श आवाज अर्धवट झोपेतल्या प्रवाशांना खडबडून जागं करतो. मुख्य महामार्ग सोडून आडबाजूच्या कुठल्यातरी बसस्थानकावर नियम आणि सक्ती म्हणून बस काही मिनिटे थांबणार असे वाटत असतानाच बसचा चालक वाहकाला जोरात आवाज देतो. "ए उतर जरा खाली, चूळ भरू, कटिंग मारू आणि मग निघू पुढं!" चालकाच्या हाकेला प्रतिसाद म्हणून दार उघडले जाते. प्रवाशांना काही सूचना देण्याची आवश्यकता न भासल्याने बसचे दार तसेच उघडे ठेवले जाते.       शेजारी बसलेल्या प्रवाशाला पुरेसं सावध करून एकेक जण लघुशंकेच्या निमित्तानं पाय मोकळे करायला खाली उतरू लागतो.           इतक्यात अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारात आकाशवाणीची जाहिरात लागावी अशा आवाजात एक विक्रेता बसमध्ये चढतो. पायात 'बूट', पण तोही वर्षानुवर्षे वापरून पुरता झिजलेला. अंगावर एक साधाच शर्ट, पॅन्टमध्ये खोचून नीटनेटके...

'सहकार' करी उद्धार, पण कुणाचा?

Image
'सहकार' करी उद्धार, पण कुणाचा?            किमान पाऊण कोटींची भली मोठ्ठी लठ्ठ गाडी खड्ड्यांमधून डौलत-डुलत तोल सांभाळत समोरून निघून गेली. ती पाठमोरी झाली तशी धुळीचा एक लोट उठला. रस्त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांनी क्षणभर डोळे चोळले. काहींनी शिव्या हासडल्या. ज्या कमानीतून गाडी बाहेर आली त्या कमानीवर आता गंज चढला होता. तांबरलेल्या खांबांवर वेलींनी चढाई केली होती.          कमानीवरील अक्षरांचे रंग केव्हाच उडून गेले होते. तरीही 'विना सहकार नाही उद्धार' हे वाक्य ओळखू येईल इतके स्पष्ट दिसतच होते.         एकेकाळी संपूर्ण राज्यात श्रीमंत समजल्या गेलेल्या साखर उद्योगातील एका सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरचे हे दृश्य. आता ही संस्था ठार आजारी पडली होती. चालवणारे ठणठणीत होते. पण कारखाना मृत्यूशय्येवर होता. खरे तर हे दृश्य आता सर्वत्र पहावयास मिळते. अगदी प्रत्येक जिल्ह्यात ही स्थिती समाजमान्य झाली आहे.          सहकार! लोकसहभागातून लोकविकास. ऐकायला, म्हणायला आणि बोलायला अगदी सु...

मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला! : रविष कुमार

Image
मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला!: - रविष कुमार            सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक, शक्य आहे की, आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल, ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न करून तिचं शरीर दाबत आहेत. पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जात आहे. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळत आहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेत आहे.           सभ्यतेच्या सामाजिक नियमांनुसार सोशल मीडिया साईट्स लवकरच या व्हिडीओचे प्रदर्शन थांबवतील. परंतु घडलेली घटना वास्तव आहे. घटनेचे तपशील तेच आहेत, जे लिहिले आहेत.आपल्याला माहीत नाही की, या व्हिडीओ नंतर त्या महिलांच्या सोबत काय झालं? जमावाची गर्दी त्यांना कुठून घेऊन येत होती? कुठे घेऊन जात होती? त्या व्हिडीओला सुरवात आणि शेवट नाहीये, फक्त मधला थोडा भाग आहे. कोणीही त्या व्हिडीओकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज तुम्ही शांत राहू शकत नाही.            पुरुषांच्या जमावाने वेढलेल्या त्या ...

महाराष्ट्र पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात व्हावी मुलभूत प्रश्नांवर चर्चा!

Image
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात काही महत्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय व्हावेत याबाबत डॉ. अजित नवले आग्रह धरणारा लेख. विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी, श्रमिक व सामान्य जनतेची परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे कारण सांगून  नेहमीच असा बहिष्कार टाकता जातो. राजकारण बदलत राहते. बहिष्कार टाकणारी व बहिष्कार टाकला जाणारी माणसे हवी तशी बदलतात. बदलत नाही तो बहिष्कार आणि बहिष्काराचे कारण. राज्यात सध्या घाऊक पक्षांतरे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या या  पक्षांतरांमुळे जनतेचे मुलभूत प्रश्न संपूर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. राजकारण रसातळाला गेले आहे. राज्य संपूर्णपणे अस्थिर झाले आहे. पक्षांतराच्या, पक्ष फोडण्याच्या किंवा पळविण्याच्या या कालखंडात येऊ घातलेल्या विधिमंडळ अधिवेशनात जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांची चर्चा होईल अशी अपेक्षा बाळगता येत नाही. मात्र असे असले तरी विरोधकांनी तसा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक कष्टकऱ्यांचे ...

मराठी कविता @ _माझी शाळा _@ 🌹शाळा एक आठवण🌹

Image
                           मराठी कविता                        @ _माझी शाळा _@ आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!                      त्यावर  करतो                      तांब्यानी प्रेस,                      तयार आमचा                      शाळेचा ड्रेस!!                                   खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!                           धोतराचं फडकं                   आमचं टिफीन,       ...

इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेताय?? मग हा लेख वाचायलाच हवा! अभियांत्रिकीला प्रवेश घेताना....डॉ. शंकर दत्तात्रय नवले यांच्या लेखणीतून

Image
इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेताय?? मग हा लेख वाचायलाच हवा अभियांत्रिकीला  प्रवेश घेताना.... डॉ. शंकर दत्तात्रय नवले यांच्या लेखणीतून महाराष्ट्रातील एमएचटी सीइटी चा निकाल जाहीर झाला आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे .प्रत्येक विद्यार्थी आपल्याला हवी असलेली ब्रँच व महाविद्यालय मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे या वर्षी कॉम्प्युटर सायन्स व आयटी या  ब्रँच कडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा आहे.  बरेचसे विद्यार्थी आपल्याला कॉम्प्युटर सायन्स व आय टी  ही शाखा मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कॉम्प्युटर सायन्सच्या जागा या निश्चित आहेत परंतु कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. आपल्याला अमुक एक ब्रँच  मिळावी ही इच्छा असणे काही गैर नाही  परंतु त्या ब्रँच साठी उपलब्ध असलेल्या जागा व त्यासाठी असलेली प्रचंड स्पर्धा तसेच आपल्याला सीईटीमध्ये मिळालेले पर्सेंटाइल याचे गणित जुळले तरच हे शक्य आहे याचाही विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात संभ्...

सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचा आज ( १९ जुलै) जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा एक लेख.-

Image
सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर  यांचा आज ( १९ जुलै) जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा एक लेख.-  सप्टेंबर-ऑक्टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........ "मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भवि...

लोकशाही में सबकुछ चलता है!: प्रा. निरंजन फरांदे

Image
दैनिक सकाळ वृत्तपत्रातील 'सह्याद्रीची शब्दफुले' सदरातील आमचे सन्मित्र प्रा. निरंजन फरांदे यांचा  आजचा लेख...लेख क्र. २१ लोकशाही में सबकुछ चलता है!                                       राजकीय गप्पांनी नेहमी गजबजलेली चहा टपरी आज शांत शांत होती. गॅस सिलेंडरचे भाव परवडेनासे झाल्यामुळे चहावाला अगदी काटकसरीनं शेगडी कमी-जास्त करत होता. चहाला चांगली उकळी आली होती. पातेल्यातून निघणाऱ्या वाफा हवेत मिसळून हवा प्रफुल्लित होत होती. दोन-तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचा गोल पुडका नुकताच येऊन पडला होता. त्याला कोणी हातही लावला नव्हता. त्यामुळे त्याचे कोरेपण टिकून होते.           रोज सकाळी याच टपरीवर चहाचे घुटके घेत एकमेकांच्या अंगावर जाणारे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक आज स्मशानात आल्याप्रमाणे शांत होते. एरवी आपापल्या पक्षांच्या भूमिकांवर (महा)चर्चा करणारे, नेत्यांची बाजू घेऊन एकमेकांना भिडणारे कार्यकर्ते अगदी मुंगीच्या पावलानं टपरीवर येऊन मान खाली घाल...
Image
चांद्रयान - 3 मोहिम ! उड्डाणासाठी सज्ज झालेय चांद्रयान -3 ! 14 जूलै 2023 रोजी 2.30 मि. होणार प्रक्षेपण !  स्थळ : सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येत्या 14 जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान  3  चंद्राच्या दिशेने झेपावेल. या मिशनच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग हा या मोहिमेतील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. चंद्रावर लँडिंगचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असणार आहे. सुमारे 48 दिवसानंतर 25/26 अ‌ॉगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार #लॅंडर व नंतर #रोव्हर तिथे फिरणार ! चंद्रावर उतरणारा 4 था देश म्हणून भारत नावलौकिक मिळवायला उत्सुक आहे ! चंद्राच्या पृष्ठभागावरील सहज उतरण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करणे तसेच तिथे रोव्हर फिरवणे यशस्वी करण्यासोबतच तेथील मातीचे तापमान, रासायनिक परिक्षण अभ्यास करण्याचे प्रमुख ऊद्देश्य ही मोहिम साध्य करेल असा इस्त्रो या संस्थेतील संशोधक, अभियंते यांना आत्मविश्वास आहे ! चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हे यान उतरणार आहे. चांद्रयान - 2 जिथे ...
Image
अडथळ्यांची शर्यत पार करत कुलाळवाडी शाळेसाठी लोकसत्ता सुरू...! (भक्तराज गर्जे यांच्या फेसबुक वॉलवरून) वर्तमानपत्र व्यक्तीला भूतकाळाची जाणीव आणि वर्तमानाचे अवलोकन करून भविष्याचा वेध घेण्याचा मार्ग दाखवतात. कुलाळवाडी शाळेसाठी सातत्याने अवांतर वाचनाची पुस्तके मुंबईहून पाठविणाऱ्या  आदरणीय सुषमा सामंत यांची शाळेसाठी लोकसत्ता सुरू व्हावे अशी प्रचंड इच्छा. लोकसत्ता हे उत्कृष्ट दर्जाचे राष्ट्रीय वर्तमानपत्र. सद्यस्थितीत कुलाळवाडीत कुठलेच वर्तमानपत्र पोहोचत नाही, त्यात लोकसत्ता सकाळी अकरा वाजे नंतर जत मध्ये पोहोचतो. त्यामुळे काम जरा कठीणच होते.      आधी मी म्हणालो हे काही शक्य होणार नाही. परंतु मग आम्ही दोघांनीही ठरवलं की प्रयत्न तर करून पाहूया. वाचनसंस्कृती रुजविण्याचा दृढ निश्चय केल्यानंतर  माझ्याशी याबाबत मार्ग काढण्यासाठी चर्चा करत असतानाच युथ फॉर जत च्या माध्यमातून देखील मावशींनी प्रयत्न सुरू केले. तरीही यातून काही मार्ग सहजी मिळत नव्हता. शेवटी मला जत हून माडग्याळ हायस्कूलला येणारे श्री. चंद्रकांत कोळी सर यांच्या माध्यमातून लोकसत्ता माडग्याळ पर्य...

राजे रामराव व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार, दोन्ही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचा पुढाकार

Image
जत/ प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. येथील राजे रामराव महाविद्यालय व कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत दोन्ही महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा व व्याख्यानामध्ये सहकार्य या बाबींचा समावेश आहे. पुढील पाच वर्ष दोन्ही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये दोन्हीही महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या सहकार्याने उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती डॉ. शिवाजी कांबळे व डॉ. ओंकार कुडाळकर यांनी दिली.           या सामंजस्य कराराप्रसंगी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. शिवाजी कांबळे तसेच प्रा. नितेश शिंदे, डॉ. सुजाता सोळगे व राजे रामराव महाविद्यालयातील डॉ. ओंकार कुडाळकर उपस्थित होते. हा सामंजस्य...

करियरची दशा आणि दिशा ओळखा: डॉ. रविंद्र आरळी विवेकानंद इन्स्टिट्यूट आयोजित तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. कोणतेच क्षेत्र दुय्यम नसुन, महाविद्यालयीन जीवनात कोणत्या दिशेने आपल्या करियरचा पाया भक्कम करावा, हे स्वतः जाणून स्वतःमध्ये विषयाची आवड निर्माण करा. कष्ट करण्याची मानसिकता ठेवून स्वतःमध्ये असलेल्या गुणांना योग्य पध्दतीने आचरणात आणून चांगले करियर घडवा. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या करिअरची दशा आणि दिशा ओळखा, असे प्रतिपादन वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकिय क्षेत्रामध्ये आदर्शवत कार्य करीत असलेले जतमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांनी केले. ते विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी या एक दिवशीय करियर मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी प्रसिद्ध युट्युबर अनिल बन्ने, डिजिटल अनालिस्टिक मॅनेजर शिवप्रसाद माळी व ग्राहक पंचायत महाराष्ट्र, पुणे विभाग उपाध्यक्ष डॉ. विद्याधर किट्टद उपस्थित होते.           करियरची दशा आणि दिशा ओळखा आणि 'आवड’, 'गरज' व 'जमतं' या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधुन, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत करियरमध...

मृदा व खडक संग्रहालय हा एक स्तुत्य उपक्रम: प्राचार्य अभयकुमार साळुंखे, राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभागाचा पुढाकार

Image
मृदा व खडक संग्रहालय हा एक स्तुत्य उपक्रम: प्राचार्य अभयकुमार साळुंखे राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभागाचा पुढाकार जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. जगभरातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मृदा व खडकाचे नुकसान होत असताना त्याचे संवर्धन व माहिती संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभाग करत आहे, अशा शब्दात श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कौतुक केले. ते राजे रामराव महाविद्यालयाला दि.१५ जुन २०२३ रोजी दिलेल्या भेटीमध्ये महाविद्यालयातील विविध विकास कामांचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे भाषा प्रयोगशाळा व इतिहास विभागातील ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.          पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे खडक व मृदेचे प्रकार पाहायला मिळतात. खडकाचे अग्निज, स्तरित व रूपांतरित हे मुख्य प्रकार तसेच अनेक उपप्रकार ही आहेत. तसेच मृदे...

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत महत्वाची: संभाजीराव सरक, राजे रामराव महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

Image
जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत महत्वाची: संभाजीराव सरक राजे रामराव महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी व मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे. "दे रे हरी, खटल्यावरी!" अशी वृत्ती आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. असे प्रतिपादन संभाजीराव सरक यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. सतीशकुमार पडोळकर उपस्थित होते.          आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, करियरसाठी शहरात जाताना आपल्या मनामधील न्यूनगंड बाजूला केला पाहिजे. नक्कीच एकेदिवशी तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहचाल. पण त्यावेळी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो, हे विसरू नका. यावेळ...

'तंत्रज्ञानातील करियरच्या संधी'१०वी, १२वी व महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, डॉ. रविंद्र आरळी, श्री.अनिल बन्ने व श्री. शिवप्रसाद माळी प्रमुख मार्गदर्शक

Image
'तंत्रज्ञानातील करियरच्या संधी' १०वी, १२वी व महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन डॉ. रविंद्र आरळी, श्री.अनिल बन्ने व श्री. शिवप्रसाद माळी प्रमुख मार्गदर्शक जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २.  येथील विवेकानंद इन्स्टिटयुट ऑफ इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजीच्या वतीने १०वी, १२ वी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी साेमवार दि. ३ जुलै राेजी सकाळी १०.०० वाजता साईप्रकाश मंगल कार्यालय, विद्यानगर, जत येथे 'इग्नाईटींग यंग २०२३' या तंत्रज्ञानातील करियरच्या संधी या विषयावर करीयर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केल्याची माहीती संस्थेच्या संचालिका व प्राचार्या सौ. उज्वला बोबडे यांनी दिली.           या कार्यशाळेमध्ये उमा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी, पुणे येथील डिजीटल ॲनालिटिक्स व्यवस्थापक श्री. शिवप्रसाद माळी, प्रसिध्द युटयुबर व युवा उद्याेजक श्री. अनिल बन्ने मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरामध्ये तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी निर...