Posts

Showing posts from June, 2023

निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Image
निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम सन्नके): दि. २१.  प्राचीन भारतीय संस्कृतीपासुन प्राणायाम, योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची आहेत. आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.       यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवतेसाठी योग" (Yoga for Humanity) ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, स...

राजे रामराव महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Image
राजे रामराव महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन जत/ प्रतिनिधी: दि. ८. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक (शिवस्वराज्य) वर्षानिमित्त दि. ६ जून रोजी भारतातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले. यावेळी परिसंवादासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. सरदार रोहिले व इतिहास विभागप्रमुख प्रा.पुंडलिक चौधरी उपस्थित होते.            ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनात दुर्मिळ वस्तू, नाणी, शस्त्रे व हत्यारे यांचा समावेश होता. भारतातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन या विषयावरील परिसंवादामध्ये प्रा. सरदार रोहिले यांनी ऐतिहासिक स्मारके, किल्ले, नाणी, कागदपत्रे इत्यादींची माहिती दिली. ऐतिहासिक वस्तूंवर मानवाच्या होणाऱ्या दुर्लक्ष व दुर्...

भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचं: डॉ. सुभाषचंद्र मालानी

Image
भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचं: डॉ. सुभाषचंद्र मालानी राजे रामराव महाविद्यालयात पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.५. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतींचा अवलंब केला तर पृथ्वीचं संरक्षण केलं जाऊ शकतं. यासाठी सर्वांनी शाश्वत पर्यांयाची निवड करण्याची आवश्यकता आहे. परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेचे संरक्षण आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन डॉ. सुभाषचंद्र मालानी यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता आम्ही कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.          दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची ...

युवकांनी श्रमाचे महत्त्व जाणावे: दिग्विजय चव्हाण

Image
युवकांनी श्रमाचे महत्त्व जाणावे: दिग्विजय चव्हाण खलाटीत राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २. आयुष्यात श्रमाशिवाय पर्याय नाही. श्रम केल्याशिवाय यशाची स्वप्ने पूर्ण होऊन सर्वांगीण प्रगती होत नाही. विद्यार्थ्यांनी श्रमाचे महत्त्व जाणवे व आयुष्यात प्रगती करावी, असे उद्गार दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केले. ते मौजे खलाटी येथे राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित साप्ताहिक विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत दादा चव्हाण, स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, सरपंच सौ. लता देवकते व ग्रामस्थ उपस्थित होते.         स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम, देशभक्ती, संघटन व एकता शिकवते. शिबिराच्या सात दिवसात युवकांमध्ये प्रचंड बदल झालेला दिसेल. मला खात्री आहे की, स्वयंसेवक मनापासून व प्रामाणिकपण...

महिला सबलीकरण, काळाची गरज: पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड

Image
महिला सबलीकरण, काळाची गरज: पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड खलाटीत विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये व्याख्यान जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.३. समाजपरत्वे, देशपरत्वे स्त्रियांचे स्थान आणि भूमिका तेथील समाज व देशांच्या रूढी, परंपरा, मूल्ये, मानदंड यामुळे  संपूर्ण जगाचा विचार करता स्त्री-पुरुषांच्या स्थान व दर्जामध्ये विविधता आढळून येते. सतत महिला सबलीकरण या संदर्भात अनेक व्यासपीठांवर चर्चा होताना दिसते. “महिला सबलीकरण, म्हणजे मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.” महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरातून समान संधी, स्थान व अधिकार देऊन महिला सबलीकरण करणे शक्य आहे. ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथकाच्या प्रमुख राजश्री गायकवाड यांनी व्यक्त केले. त्या राजे रामराव महाविद्यालयाच्या मौजे खलाटी ता. जत येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रा...

शाश्वत शेतीमुळे ग्रामसमृद्धी शक्य: मनोज वेताळ

शाश्वत शेतीमुळे ग्रामसमृद्धी शक्य: मनोज वेताळ खलाटीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये मनोगत जत/प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.४. शाश्वत व विषमुक्त शेती केल्यामुळे शेतकऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण गावाची ग्रामसमृद्धी शक्य असल्याचे प्रतिपादन जतचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने मौजे खलाटी, ता. जत येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून दऱ्याप्पा शेजुळ उपस्थित होते.       अधिक बोलताना मनोज वेताळ म्हणाले, की भारत हा कृषिप्रधान देश आहे. शासनाच्या विविध योजना ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीबरोबरच ग्रामसमृद्धी कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करावे. आपल्या अध्यक्ष भाषणात शेजुळ म्हणाले, खलाटी गावातील शेतकरी शासनाच्या विविध योजना आपल्या बांधापर्यंत कशाला राबवल्या जातील यासाठी सतर्क राहतील व आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या मार्फत शाश्वत शेती केली जाईल.      या कार्यक्रमाचे स्...

विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा: ॲड. राजेंद्र म्हमाने

Image
विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा: ॲड. राजेंद्र म्हमाने न्यायदेवता आपल्या दारी उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाच्या आयोजन जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.५. विद्यार्थीदशेत कळत न-कळत कायदा मोडला जातो. अशावेळी दंड व शिक्षाही होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच कायद्याचा सखोल अभ्यास करून वर्तन केले तर त्यांची प्रगती होते, असे उद्गार ॲड. राजेंद्र म्हमाने यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या मौजे खलाटी, ता. जत येथील निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी 'कायदा आपल्या दारी' या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून खलाटी गावचे ॲड. संदीप कोळी उपस्थित होते.          आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप कोळी म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास, देशप्रेम, राष्ट्रभक्ती व समाजिक भान इत्यादी गुण माझ्या अंगी रुजले गेले. आज मी जिल्हा व सत्र न्यायालयमध्ये वकिली करत...

जवान देशाचा आधारस्तंभ असतो: अंकुश शेजाळ

जवान देशाचा आधारस्तंभ असतो: अंकुश शेजाळ खलाटीत सन्मान राष्ट्रीय योद्धांचा कार्यक्रम संपन्न जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): ऊन, वारा, पाऊस, वादळ, उष्णता व अतिकडाक्याची थंडी अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाऊन देशाची व राष्ट्राची कर्तव्यदक्ष सेवा करणारा जवान हा देशाचा आधारस्तंभ असतो, असे प्रतिपादन माजी सैनिक अंकुश शेजाळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे खलाटी, ता. जत येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवशी 'सन्मान राष्ट्रीय योद्धांचा' या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून खलाटी गावचे माजी सैनिक बाळासाहेब भिरडकर उपस्थित होते.        पुढे बोलताना शेजाळ म्हणाले, सैनिक अनेक गोष्टींचा त्याग करतो. आपले कुटुंब समाज व गाव सोडून देशाच्या सीमेच्या संरक्षणासाठी तो डोळ्यात तेल घालून उभा राहतो. त्यावेळी सर्व नागरिक शांततेने झोप घेतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष भिरडकर म्हणाले, दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील अनेक तरुण देशसेवेचा ध्यास घेऊन सैन्यात, पोलीस व इतर संरक्षण क्षेत्रामध्ये भरती ...

भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम म्हणजे कविता: डॉ. सतीशकुमार पडोळकर

Image
भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम म्हणजे कविता: डॉ. सतीशकुमार पडोळकर खलाटीत कवी संमेलन उत्साहात संपन्न जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.७. कवी आपल्या भावना कल्पनांच्या आधारे व्यक्त करतो. तो काल्पनिक गोष्टी वास्तव रूपाने वाचकांपुढे मांडतो. म्हणूनच भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम कविता आहे, असे प्रतिपादन डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे खलाटी, ता. जत येथील साप्ताहिक विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये सहाव्या दिवशी कवी संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.       आपल्या भाषणात पडोळकर म्हणाले, कविता हा साहित्याचा सर्वात जुना प्रकार असून कमी शब्दांमध्ये जास्त आशय देणारा हा साहित्य प्रकार आहे. मनामध्ये चाललेला भावनांचा खेळ कवी शब्दरूपी गोष्टीतून व्यक्त करतो, यालाच कविता म्हणतात. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र लवटे यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी कवींचा शब्दरूपी आढावा घेतला. यामध्ये विल्यम वर्डसव...

पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण डिजीटल पत्रकारितेमुळे झाले:प्रा स्नेहल वरेकर

Image
पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण डिजीटल पत्रकारितेमुळे झाले:प्रा स्नेहल वरेकर जत(प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): गुरुवार, दि.02 मार्च 2023 रोजी राजे रामराव महाविद्यालय जत, अग्रणी महाविद्यालय योजना, हिंदी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पत्रकारिता: स्वरूप, प्रक्रिया व रोजगाराच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील प्रा. स्नेहल वरेकर या उपस्थित होत्या. डिजिटल पत्रकारिता: स्वरूप, प्रक्रिया व डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात असणाऱ्या रोजगाराच्या संधी याविषयी बोलताना प्राध्यापक स्नेहल वरेकर म्हणाल्या, "पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजिटल पत्रकारिते मुळे झाले. डिजिटल पत्रकारिता ही आजच्या युगाचे एक प्रभावी माध्यम आहे. डिजिटल पत्रकारितेने नागरिक पत्रकारितेला बळ दिले. या पत्रकारिते मुळे प्रत्येक व्यक्ती हा एक जागरूक भारतीय नागरिक बनून समाजामध्ये विधायक बदल घडवू शकतो." या कार्यशाळेत विद्या...

आपत्कालीन सेवा ही सुद्धा समाजसेवा: विजय पवार

Image
आपत्कालीन सेवा ही सुद्धा समाजसेवा: विजय पवार राजे रामराव महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. १५. जगातील अनेक विकसित देशात विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण तेथील प्रशासनाकडून मिळालेले असते. त्यामुळे अशा देशांमध्ये अतिशय शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने विद्यार्थी व नागरिक मदत कार्यात सहभागी होतात. याउलट अविकसित व विकसनशील देशांमध्ये हे होत नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती व संकटकाळी अनेक अडचणी व समस्या निर्माण होतात. अशावेळी युवकांनी आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण घेऊन समाजसेवा करावी. आपत्कालीन सेवा ही सुद्धा समाजसेवा असते, असे प्रतिपादन सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. य...

राजे रामराव महाविद्यालयाचा पारंपारिक दिन उत्साहात

Image
राजे रामराव महाविद्यालयाचा पारंपारिक दिन उत्साहात नृत्यांवर थिरकली तरुणाई! जत(प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): राजे रामराव महाविद्यालय,जत सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. आपल्या उद्घाटनपरक भाषणात बोलताना ते म्हणाले, 'आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे, पंथाचे, भाषेचे लोक राहतात. या सर्व लोकांना एकत्रित जोडण्याचे काम हे भारतीय संविधनाबरोबरच भारतीय संस्कृतीने केलेले आहे. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन व समृद्ध आहे आणि या प्राचीनतम संस्कृतीचे जतन अशा पारंपारिक दिनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनच होत असते.'   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोगुलवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व म्हणाले, 'शैक्षणिक कामकाजा बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, विद्यार्थ्य...

तरूण वयातचं जीवनाला आकार मिळतो: डॉ. अरुण शिंदे

Image
तरूण वयातचं जीवनाला आकार मिळतो: डॉ. अरुण शिंदे राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न गुणवंत प्राध्यापक, खेळाडू व विद्यार्थ्यांचा केला सन्मान जत, प्रतिनिधी ( प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. १८. समाजमाध्यमाच्या या युगात तरुण विद्यार्थी सैरभैर झाले असून विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य व करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद घेत या वयातचं जीवनाला खरा आकार मिळतो, असे प्रतिपादन प्रेरक वक्ते डॉ. अरूण शिंदे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, कार्याध्यक्षा डॉ.  निर्मला मोरे उपस्थित होत्या.           आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे म्हणाल्या, आजच्या तरूणांमध्ये प्रचंड उर्जा आहे. या उर्जेचा वापर चांगल्या कार्यासाठी केला तर जीवन सुखी व आनंदी होते. खडतर परीस्थितीतुनच माणसाच...

जतेत महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे

Image
जतेत महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे राजे रामराव महाविद्यालयामध्ये महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २९. देशभरातील महाविद्यालयीन तरुणी व महिला यांच्यावरील वाढते हल्ले, छेडछाडीचे प्रकार, अत्याचार व मारहाण पाहता राजे रामराव महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण विभागाच्या वतीने 20 ते 30 मार्च या कालावधीमध्ये दहादिवसीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लता करांडे यांनी दिली.           अधिक बोलताना ते म्हणाले, या दहादिवशीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये जतमधील प्रसिद्ध योगशिक्षिका अनुराधा संकपाळ त्याचबरोबर कराटे प्रशिक्षक शितल बामणे व महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे 50 निवडक विद्यार्थिनींना योगा, कराटे व लाठी-काठी यासारखे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त प्रशिक्षण देतील. स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणींना सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम राबवल्या...

सेवेला निवृत्ती नसते: प्रा. किसन कुराडे

Image
सेवेला निवृत्ती नसते: प्रा. किसन कुराडे डॉ. निर्मला मोरे यांच्या सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ३०. माणसाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य, प्रौढावस्था व वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे असतात. नोकरीमध्ये दीर्घकालीन सेवा करूनही प्रत्येक टप्प्यात माणसाला काम करावेच लागते. याचे आदर्श उदाहरण म्हणून आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पाहू शकतो. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाची गंगा गरीब, वंचित व खेडोपाड्यातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यभर सेवा केली. सेवेला निवृत्ती नसते. डॉ. निर्मला मोरे यांच्याकडूनही आयुष्यभर सेवा घडत राहिल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसन कुराडे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयात मराठीच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. निर्मला वसंतराव मोरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या व सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी प्रशासन सहसचिव प्राचार्य पुंडलिक चव्हाण, विद्यावाचस्पतीचे मार...

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता आवश्यक: रवींद्र माने

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता आवश्यक: रवींद्र माने राजे रामराव महाविद्यालयात डिजीटल पत्रकारिता यावर वेबिनार संपन्न जत/प्रतिनिधी: दि. ६. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल पत्रकारिता' प्रमाणपत्र कोर्स अंतर्गत एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक लोकसत्ता डिजीटल माध्यम विभागाचे (इंडियन एक्स्प्रेस माध्यम समूह) उपसंपादक श्री.रवींद्र माने उपस्थित होते.       ' डिजीटल पत्रकारिता: स्वरूप,मूल्ये व आव्हाने ' यावर बोलताना ते म्हणाले, 'आज पत्रकारिता हा एक व्यवसाय जरी असला तरीही त्याची काही मूल्ये आहेत. भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता गरजेची आहे.' या वेबीनारचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ.सुरेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले, 'आज पत्रकारिता हे व्यवसायाचे माध्यम जरी बनले असले तरी ज्या मूल्यांना केंद्रीभूत मानून पत्रकारिता सुरू झाली त्या मूल्यांशी पत्रकारितेने फारकत घेतल्यास भारतीय लोकशाहीचा गाभाच नष्ट...

सुखदेव नरळे एक सुसंस्कृत प्राध्यापक : प्राचार्य डॉ. सुरेश पाटील सेवा गौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार

सुखदेव नरळे एक सुसंस्कृत प्राध्यापक : प्राचार्य डॉ. सुरेश पाटील सेवा गौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. १. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक व संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ब्रीदवाक्यानुसार साडेतीन दशकापेक्षा जास्त आपली सेवा देणारे राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विषयाचे जेष्ठ प्राध्यापक सुखदेव सोपान नरळे हे बापूजींच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा वसा घेऊन जगणारे, एक प्रामाणिक, मितभाषी व सुसंस्कृत प्राध्यापक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते प्रा. सुखदेव नरळे यांच्या नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सेवा गौरव समारंभामध्ये बोलत होते. यावेळी नरळे यांच्या पत्नी, आई, कुटुंबीय, नातेवाईक व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.           आपल्या सेवा गौरव सत्काराला उत्तर देताना प्रा. नरळे यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांड...

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी आत्मकेंद्री होत आहे: दिनराज वाघमारे राजे रामराव महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

Image
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी आत्मकेंद्री होत आहे: दिनराज वाघमारे राजे रामराव महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन जत प्रतिनिधी: माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी उद्धारासाठी होणे अपेक्षित असताना तरुण पिढी मात्र आत्मकेंद्री बनत चालली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग, माजी विद्यार्थी संघटना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.        आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, आहार, शेती, उद्योग व सेवा या क्षेत्राचा उल्लेख केला. माहिती व तंत्रज्ञान हे मानवी विकासातील एक महत्त्वाचे साधन असून त्याचा उपयोग मानवी कल्याणासाठी होणे अपेक्षित असताना त्याच्या आहारी जाऊन आजच्या युगातील तरुण आत्मकेंद्री झाला असून त्याचा दूरगामी परिणाम येणाऱ्या अनेक पिढीस बसेल, असेही याव...

जतमधे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती अभियान

Image
जतमधे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती अभियान राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३' साजरे करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्याच्या पुढाकाराने जगभर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असताना त्याला प्रतिसाद म्हणुन राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक जत तालुक्यातील गावोगावी जाऊन याविषयी जनजागृती करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके व डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.        राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जत तालुक्यातील राव...

डिजिटल बँकिंगविषयी जतेत जनजागृती राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी

Image
डिजिटल बँकिंगविषयी जतेत जनजागृती  राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): डिजिटल बँकिंग सेवा आधुनिक भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिटच्या स्थापनेची घोषणा केली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील ७५ जिल्ह्यांत ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सोप्या होणार आहेत. यामुळे खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये पैसे पाठवण्यापासून कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे होईल. येणारा काळ हा इंटरनेट व तंत्रज्ञानाचा असल्यामुळे बँकेतील व्यवहार डिजिटल कसे करावे, याविषयी राजे रामराव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक गावोगावी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते एक मे महाराष्ट्र व कामग...

राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन संपन्न

Image
राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन संपन्न  इंग्रजी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने यशस्वी आयोजन जत/प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २७. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग, सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. २६ एप्रिल २०२३ रोजी राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी स्पर्धकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड या भाषेतील विविध देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील तर अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रामदास बनसोडे उपस्थित होते.        देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. याला प्रतिसाद म्हणून राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व सांस्कृतिक विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये प्रथम...

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

Image
 राजे रामराव महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा  विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ जत (प्रतिनिधी): दि. १. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या असंसर्गजन्य रोगाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती व तंबाखू मुक्तीची शपथ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभर ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील आरोग्य संस्था, शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयामध्ये या संदर्भात जनजागृती केली जाते. याचाच भाग म्हणून जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यात आली व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी उपस्थितांना जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ दिली.           या जनजागृती कार्यक्रमांमध...