Posts

Showing posts from August, 2023

स्पर्धा परीक्षा हा करिअरचा उत्तम राजमार्ग: प्रा. रेश्मा लवटे

Image
जत दि.30 (प्रतिनिधी: प्रा. तुकाराम उमेश सन्नके) स्पर्धा परीक्षा हा करिअरचा राजमार्ग असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाला हमखास गवसणी घालता येते. मात्र  ९० ते ९५ टक्के विद्यार्थी अभ्यास न करता या परीक्षांना सामोरे जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा या मृगजळ ठरत असल्याचे प्रतिपादन प्रा. रेश्मा लवटे यांनी केले. त्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकरा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन शिबिरामध्ये 'स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ.भिमाशंकर डहाळके उपस्थित होते.            स्पर्धा परीक्षा हा करियरचा राज्यमार्ग वाटत असला तरी तो तितका सोपा नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत व परिश्रम घ्यावे लागतात, असे सांगून प्रा.रेश्मा लवटे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व नियोजन कसे करावे व स्पर्धा परीक्षेचे प्रकार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ...

विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतुकीचे नियम पाळावेत: पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे

Image
जत /प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २९. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली जाते. महाराष्ट्रासह देशांमध्ये रस्ता दुर्घटना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या असून महाविद्यालयीन तरुणांनी रस्ता वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या जिमखाना व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'क्रीडा झेत्राचे भविष्य व आव्हानांचे संधित रूपांतर' या विषयावर विषेश व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.          अधिक बोलताना उपनिरीक्षक समाधान घुगे म्हणाले, कळत- नकळत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याकडून चुका होत असतात. आपले आई-वडील व शिक्षका...

जतमधे पंचप्रण शपथ, जनजागृती रॅली व महावृक्षारोपण संपन्न, राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजन

Image
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 'माझी माती माझा देश' या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेद्वारे देशाच्या अमृत महोत्सव समाप्तीच्या निमित्ताने प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. याला प्रतिसाद म्हणून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. त्याचबरोबर जत शहरातून रॅली काढून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिक मुक्ती, शाश्वत शेती, साफसफाई व स्वच्छता या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यानंतर तालुका कृषी चिकित्सालय तथा तालुका कृषी कार्यालय परिसरामध्ये प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपणास सुरुवात झाली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळून तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरामध्ये २००० पेक्षा जास्त विविध झाडांचे वृक्षारोपण केले.        या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील सातपुते यांनी ...

शाश्वत शेतीच विकसित शेतकरी घडवेल: मनोज वेताळ, राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन

Image
जत/ (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय. शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. यावर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असतानाच सध्याच्या काळात शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकाचा अतिवापर होत आहे. विकसित शेतकरी घडवायचा असल्यास शाश्वत शेतीबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. याशिवाय शेतीला पर्याय नसल्यास मत जतचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी 'शाश्वत शेती व विकसित शेतकरी' या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.        अधिक बोलताना ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना प्रत्येक महिन्यात एका तृणधान्याला समर्पित महिना जाहीर होतो. ऑगस...

राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका: डॉ. राजेंद्र लवटे, राजे रामराव महाविद्यालयात ११ दिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेला प्रारंभ

Image
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.१७. राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयामार्फत चालवली जाणारी भारतातील सर्वांत मोठी युवकांची संघटना असून याअंतर्गत देशभरातील ४५ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचे संघटन झाले आहे. सामुदायिक सेवेद्वारे व्यक्तिमत्त्व विकास, वृक्षेरोपण, जलसंधारण, श्रमसंस्कार शिबिर, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, संभाषण कौशल्य, ग्रामीण जन जीवनाचा अनुभव यामुळे राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्याल जीयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन व अकरा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका याविषयी व्याख्यानात माहिती देताना बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.        अधिक माहिती देताना डॉ . लवटे म्हणाले, राष्ट्रीय एकता शिब...

राजे रामराव महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महापुरुषांवर आधारित नाण्यांचे प्रदर्शन, इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजन

Image
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात देश घडविण्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दिले, अशा महान विभूती व महापुरुषांवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेल्या नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची ओळख व्हावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ उपस्थित होते.          यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात...