कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी

जतमध्ये शब्दगंधर्व खुले कवी संमेलन व नवकवयित्री उज्वला कांबळे यांचा वास्तविकतेचे प्रतिबिंब उलघडणारा उज्वल चंद्र काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न
जत प्रतिनिधी: दि.२. कवी आपल्या भावना कल्पनांचा आधारे व काल्पनिक गोष्टी वास्तव रूपाने वाचकांपुढे मांडतो. माणसाच्या भावना अभिव्यक्त करणारे माध्यम हे कविता आहे. कवी हा ईश्वररूप असुन स्व-रूप लिहितो. म्हणूनच कविता ही कवीच्या मनाची प्रेरणा असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. ते श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ, शब्दगंधर्व साहित्य परिवार, मराठी साहित्य सेवा मंच व राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले शब्दगंधर्व खुले कवी संमेलन व उज्वला कांबळे लिखित उज्वल चंद्र या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
यावेळी ज्येष्ठ कवी व गझलकार सुधाकर इनामदार, कवी लवकुमार मुळे, कादंबरीकार आनंदहरी, नवकवयित्री उज्वला कांबळे, श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजी भोसले, प्रभाकर जाधव, विनायक कुलकर्णी, डॉ. सरिता पट्टणशेट्टी, अनिल देशपांडे व प्रा. तुकाराम सन्नके उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष लवकुमार मुळे यावेळी बोलताना म्हणाले, कविता हा साहित्याचा सर्वात जुना प्रकार असून तो कमी शब्दांमध्ये जास्त आशय देतो. मनामध्ये चाललेला भावनांचा खेळ कवी शब्दरूपी गोष्टीतून व्यक्त करतो. उज्वला कांबळे यांनी आपल्या आयुष्यात घडलेले वास्तविकितेचे प्रतिबिंब काव्यसंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उज्वल चंद्र हा काव्यसंग्रह माती, नाती, भीम, बुद्धाचे गोडवे गाणारा उज्वल संग्रह आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना उज्वला कांबळे म्हणाल्या, लहानपणापासूनच कविता वाचनाचा व लिहिण्याचा छंद होता. कविता लिहीत गेले व आज त्याचा संग्रह झाला. राजे रामराव महाविद्यालयातील प्रा. तुकाराम सन्नके व डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक दयासागर बन्ने, मच्छिंद्र ऐनापुरे, लवकुमार मुळे व प्रकाशक इंद्रजीत घुले यांनी या काव्यसंग्रहास मूर्त रूप दिले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे हा काव्यसंग्रह प्रकाशित करता आला. तसेच हा काव्यसंग्रह प्रकाशित होण्यास माझे आई-वडील, भाऊ, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व राजे रामराव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 
शब्दगंधर्व खुले कवी संमेलनात जत, सांगोला, मंगळवेढा, इस्लामपूर, कवठेमंहकाळ, आटपाडी, वारणा-कोडोली, शिराळा व तासगाव तालुक्यातील २५ पेक्षा जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवला व विविध विषयावर कविता सादर केल्या. 
कवी संमेलन व काव्यसंग्रह प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन वैष्णवी जाधव यांनी तर आभार अनिल देशपांडे यांनी व्यक्त केले. यावेळी रावसाहेब यादव, राजेंद्र माने, सहदेव माळी, डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ. लक्ष्मण भरगंडे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. सुरेश बामणे, प्रा. रवींद्र काळे, प्रा. सत्यवान खोटलेकर, पापा कुंभार, सुभाष शिंदे, चंद्रकांत कोळी, सुधीर चव्हाण, लक्ष्मण कांबळे व सुनील बनसोडे यासह जत शहर व जत पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी व श्री.अंबिका देवी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
माती, नाती, भीम, बुद्धाचे गोडवे गाणारा उज्वला कांबळे यांचा उज्वल चंद्र हा काव्यसंग्रह पुढील पिढीस निश्चित दिशादर्शक ठरेल. कन्नड व मराठी या दोन्ही भाषेचा वारसा असलेल्या उज्वला साहित्य क्षेत्रात निश्चित आपले वेगळे स्थान निर्माण करतील, अशी मला खात्री वाटते.
.                       



#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील